एटापल्ली तालुका

नाटक हे साहित्याचा अविभाज्य घटकासह अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यमही आहे !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

एटापल्ली.....महाराष्ट्राला नाटकांची प्राचीन व समृद्ध परंपरा आहे.महाराष्ट्राला नाट्यवेडा प्रदेश म्हणूनही ओळखला जातो.नाटक हे शब्दसंहिताविरहीत व अभिनयविरहित असतात.जिवंत,मृत,पौराणिक,ऐतिहासिक,काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटानीं रंगमंचावर सादर केलेल्या सादरीकरण म्हणजेच नाटक असून नाटक हे साहित्याच्या अविभाज्य घटक असून अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम ही असल्याचे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले. ते एटापल्ली येथे जागृती अभिनय औद्योगिक संस्था एटापल्ली कडून आयोजित येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या आयोजित *टाकलेलं पोरं* या नाटकाचा उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते. एटापल्ली येथे आयोजित *टाकलेलं पोरं* या नाटकाच्या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य संजुभाऊ चरडुके प्रमुख पाहुणे म्हणून आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, मुख्याध्यापक चौहान,नगरपंचायत सभापती राघव सुल्वावार, नामदेव हिचामी,माजी सरपंच विजय कुसनाके,प्रज्वल नागुलवार,जुलेख शेख, राकेश तेलकुंटलावार, संदीप बडगे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या नाटकाच्या उदघाटनाला मंडळाचे पदाधिकारी व प्रेक्षकगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close