एटापल्ली तालुका

अहेरी विधानसभेतील समस्या सरकारच्या दरबारी मांडण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

एटापल्ली… अहेरीचे दोन्ही घराणे पूर्वीपासून स्व:स्वार्थासाठी राजकारण करीत आहे. या क्षेत्रातील कोणत्याही समाजाच्या समतोल विकासात त्या घराण्यांच्या किंचितही योगदान नाही.त्यांच्या स्व:स्वार्थाच्या राजकारणामुळे आज संपुर्ण विधानसभाच अधोगतीकडे जातांना दिसून येत आहे. आताही जर आपण या घराण्यांच राजकारणाच्या भरवशावर राहिले तर विधानसभेच्या शाश्वत विकास होणे शक्यच नाही.सगळीकडे अमृतमहोत्सव साजरा होत आहे तर दुसरीकडे अनेक गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरलेलं आहे.या क्षेत्रातील अनेक गावांमधील नागरिक मूलभूत सोयीसुविधां पासून वंचित आहे.या विधानसभा क्षेत्रात रोजगार आणि सिंचनाची पूर्णतःअभाव आहे.या विधानसभा क्षेत्रातील समस्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या दरबारात मांडण्यासाठी आणि विधानसभा क्षेत्रात विकास घडवून आणण्यासाठी आता आपल्याला रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याशिवाय दुसरे पर्यायच नसल्याचे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले.

ते एटापल्ली येथे स्थानिक विश्रामगृहात आयोजित आदिवासी विद्यार्थी संघाचे मुख्य कार्यकर्त्यांच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यकर्ता बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून एटापल्ली आविसचे तालुका अध्यक्ष नंदुभाऊ मट्टामी,माजी जि.प.सदस्य संजुभाऊ चरडूके,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,आविस नेते प्रज्वलभाऊ नागुलवार,आविस सल्लागार तथा वेनहारा इलाका अध्यक्ष सुधाकर गोटा,माजी प.स.सदस्य रमेश तोरे,भीमराव देवतळे,माजी पं. स.सदस्य मंगेश हलामी,माजी सरपंच सुनील मडावी,नानेश गावडे,सुरेश तलांडे,राकेश बोलमपल्लीवार,दिलीप आलाम, माजी उपसरपंच रमेश दुग्गा,प्रफुल दुर्गे,रमेश पुंगाटी, रामा मडावी,अजय गावडे,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,संदीप बडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आविसं कार्यकर्त्यांच्या बैठकीला संबोधित करताना माजी आमदार दिपक दादा आत्राम पुढे म्हणाले, आदिवासी विद्यार्थी संघाचे प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये त्याग,प्रामाणिकपणा, आत्मसन्मान,कल्पकता आणि चिकाटीचे गुण असून सामाजिक चळवळीत निस्वार्थ भावनेने स्वतःला झोकून देत नवी नायकत्व निर्माण करण्याची ताकद असल्याचे सांगत नेत्याच्या यशस्वीतेमध्ये कार्यकर्त्यांच्या वाटा असतो म्हणूनच आदिवासी विद्यार्थी संघात नेत्यांकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नेहमी आदर अभिमान केला जात असतात,आविसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत येत्या काही महिन्यात विधानसभा क्षेत्रात आदिवासी विद्यार्थी संघाची नवीन कार्यकारणी गठीत करणार असून यात पन्नास टक्के आदिवासी आणि पन्नास

टक्के इतर समाजातील युवक -युवतींना स्थान देणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close