अहेरी-खमनचेरु या रस्त्याची माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली पाहणी !
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
📝अहेरी तालुक्यातील ग्रा.प.खमनचेरु टू अहेरी हा आदिवासी बहुल जिल्हा असून या जिल्ह्यात विकास कधी होणार तरी अहेरी खमनचेरू हे तालुक्याला जोडणारा एकमेव मुख्य मार्ग आहे.Cmgsy च्या अधिकाऱ्यांनी या रोड चे काम सुरु करून जनेची मागणी पूर्ण करायला तयार असतांना वनवीभागाचे काही कर्मचारीयांनी या कामात आडकाटी टाकून रोकून धरले असून अहेरी येथील माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यानी वन अधिकारी DFO साहेबांना या बाबद विचारणा केली असता अहेरी खमनचेरू रोड चे काही भाग वनविभागाच्या अख्त्यांरीत येत असल्याने वन विभागाने काम रोखले अशी चर्चा अहेरी व खमनचेरू गावात सुरु होती.जेरोड मागील पन्नास वर्षांपासून असून अचानक पणे वन विभाच्या अख्त्यांरीत कसे काय?आले असा प्रश्न जनता करीत आहे.जेव्हा विकास काम होणार असते तेव्हा वनविभाग विकास रोकून धरतात हे मात्र समजण्या पलीकडचे आहे.जनता हि वेळो वेळी वन विभाला मदत करत असते मात्र वन विभाग मात्र जनेचे काम होऊ देत नव्हते पण DFO टोलिया साहेबांशी चर्चा केल्यावर फॉरेस्ट विभागाने दाखवले हिरवी जेंडी आणि आज पासून कामाला सुरुवात..!!
यावेळी उपस्थित कु.सुनीता कुसनाके माजी जि. प.सदस्य, अहेरी नगर पंचायत चे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार ,शायलू मडावी सरपंच खमनचेरु,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी होते.