अहेरी तालुकाराजकीय वृत्त

लगाम परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी:लगाम परिसरातील गीताली व शांतिग्राम येथील प्रतिष्ठित व्यक्तींचा काल आलापल्ली येथे भारत राष्ट्र समितीचे नेते,आविस विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश चा कार्यक्रम पार पडला.
या वेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते ग्राप सदस्य आनंद मंडल गीताली,निलकमल मंडल गिताली, दिपणकार बिस्वास गीताली,जितेंद्र शील गीताली,सुरेश बाईन गीताली,सुधीर बिस्वास शांतिग्राम, शंकर हलदर शांतिग्राम, महाराज बाराई शांतिग्राम या मान्यवरांना शाल व पक्षाचा दुप्पटा टाकून पक्ष प्रवेश करण्यात आला.
यावेळी शांतिग्राम उपसरपंच श्रीकांत समद्दार,माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,माजी सरपंच दिलीप गंजीवार, माजी सरपंच विजय कुसनाके, जुलेख शेख,संदीप बडगे,विनोद कावेरी,महेश सडमेक,माजी सरपंच रामलु कुडमेथे,सुधाकर कोरेत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close