सिरोंचा तालुका

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या उपस्थितीत बंधाऱ्याचे भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

◆सिरोंचा◆:गरकापेठा ग्राम पंचायत अंतर्गत कोटा पोचमपल्ली येथील शेतकऱ्यांची बंधारा बांधकामासाठी खूप दिवसापासून ची मागणी होती.शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता ग्राम पंचायत कडून महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून जल संधारण विभागामार्फत बंधारा मंजूर करून घेतले.त्या बंधारा बांधकामाचे भूमिपूजन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या उपस्थितीत गरकापेठा ग्राम पंचायत चे सरपंच सूरज गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.बंधारा मंजूर झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना आता बारा महिने पीक घेता येणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले. यावेळी आविस सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम,माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,गरकापेठा सरपंच सूरज गावडे,गरकापेठा उपसरपंच वेंकटी दासरी,व्यंकटापूर सरपंच अजय आत्राम,मादाराम सरपंच दिवाकर कोरेत,आविस सिरोंचा शहराध्यक्ष रवी सुलतान,आविस सल्लागार राजन्ना दुर्गम,आलापल्ली माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,आविस सल्लागार विजय रेपालवार,आविस सल्लागार साई मंदा,आविस सल्लागार दुर्गेश लंबडी,रवी दुर्गम,नागेश जाडी,आविस सल्लागार संतोष पडालवार,महेश कावरे,पोलीस पाटील सडवली कोंडागुर्ला,रवींद्र रामटेके,सुधाकर दुर्गम,गणेश बचलकुरा,समय्या मारबाईना,तिरुपती मारबाईना,जपन्ना आसामपल्ली,दासू बोंमावार,मधुकर बुर्रम,शंकर पानेम सह शेतकरी,जल संधारण विभागाचे अभियंता,कामाचे कंत्राटदार,आविस व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close