अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी....तामिळनाडू राज्यातील मिकजॉम वादळाची फटका महाराष्ट्रातल्या दक्षिण गडचिरोलीतील सिरोंचा,अहेरी,मूलचेरा,भामरागड आणि एटापल्ली या तालुक्यांना बसली असून या भागात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पाऊसाची संततधार सुरू असून या अवकाळी पावसामुळे दक्षिण गडचिरोलीतील शेतकऱ्यांना बसले असून यात अनेक शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाली आहे.राज्य सरकार व संबंधित विभागाने शेतकऱ्यांची पिकांची नुकसानीची तात्काळ पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी आविसं नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांनी केली आहे. अवकाळी पावसामुळे दक्षिण गडचिरोलीतील सिरोंचा,अहेरी,एटापल्ली,भामरागड आणि मूलचेरा या तालुक्यातील शेतकऱ्यांची धान,मिरची,कापूस आदि पिकांची नुकसान झाली असून या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या उभी पिके या अवकाळी पावसामुळे पूर्णतः नष्ट झाल्याने शेतकरी चिंतातुर झालेले आहे.या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांची झालेल्या नुकसानीची मोका पंचनामे करून राज्य सरकारने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.