अहेरी तालुका

पावणे तीनशे क्विंटल कापसाची गंजी जळाली..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : मुख्यालया पासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या देवलमारी,मोद्दूमतुरा येथील अमित नागूलवार ,पराग आईलवार आणि महेश लेकूर या तिघांनी मिळून सुमारे 176 क्विंटल कापूस वेचणी करून शेतात ठेवले होते.कापसाला अचानक पणे आग लागल्याने यात शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले आहे.यात 20 लाखांचा कापूस जळून खाक झाली आहे.14 जानेवारीला दुपारी हे तिघे कापूस वेचणीच्या कामात मग्न होते.याच वेळी शेतात वेचून ठेवलेल्या कापसाला तिन जागी आज्ञातांनी आग लावून तिघांनी घटनास्थळावरून पसार झाल्याची माहीती मिळाली आहे.

या घटने ची माहिती परिसरातील आविसं व काँग्रेसचे कार्यकर्त्यांन कडून तसेच नागरिकान कडून आविसं – काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना सांगतच अजयभाऊंनी नगरपंचायत अहेरी येथील अधिकाऱ्यांना दूरध्वनी द्वारे घटनेची माहिती दिले.यावेळी अधिकाऱ्यांनी अग्निशमन वाहन तात्काळ घटनेच्या ठिकाणी पाठवून दिले.

माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी घटनेची स्थाळ धाव घेऊन.घटनेची माहिती जाणून घेतले, दूरध्वनी वरून घटनेचे माहिती एस.डी.एम.आणि उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांना सांगून लवकर लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना शासन कडून मदत करण्यात यावी म्हणून सांगितले.

यावेळी उपस्थित सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतु मडावी,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,वैभव कंकडालवार ग्रा.प.उपसरपंच इंदाराम,सुधाकर तिम्मा तालुका अध्यक्ष आविसं भामरागड,गुलाबराव सोयाम माजी सरपंच इंदाराम,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,स्वप्नील मडावी सामाजिक कार्यकर्ते,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवरसह आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close