अहेरी तालुका

पुलांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत आवगमनासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्याची मागणी..!

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची मागणी..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…प्रतिनिधी…

अहेरी : आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड या दोन्ही मार्गावर ठिकठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे.मात्र या ठिकाणी नागरिकांना आवागमन करण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात न केल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं आहे. करिता दोन्ही मार्गावर पर्यायी पक्का रस्त्याची व्यवस्था करण्याची मागणी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

अहेरी तालुक्यात विकासकामे सुरू आहे.आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड मार्गावर पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे.सदर कामे कंत्राटदारांनी पर्यायी रस्ते तयार न करताच सुरू करण्यात आल्याने पावसाळ्यात परिसरातील नागरीकांना नाहक त्रास सहन करावं लागत आहे.

           पर्यायी रस्त्याभवी परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधेकरीता तालुका व जिल्हास्तरावर जाणे कठीण झाले आहे.त्याकरीता या दोन्ही मार्गावर पुलांचे व रस्त्यांचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार यांना काळ्या यादीत टाकुन संबंधीतावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कांकडलवार यांनी केली आहे.

येत्या पंधरा १५ दिवसाचे आत पक्का रस्त्याचे पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अन्यथा १३ ऑगस्ट पासून आलापल्ली – सिरोंचा, आलापल्ली भामरागड, आलापल्ली अहेरी व आलापल्ली आष्टी या चारही मार्गावर राष्ट्रीय कांग्रेस पक्षाकडून चक्का जाम आंदोलन करण्याची इशारा सुध्दा  जि .प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी निवेदनातून दिला आहे.

अप्पर जि्हाधिकारी  विजय भाकरे यांना निवेदन देतांना अजयभाऊ कंकडालवार यांचे समवेत माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलाडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी उपसरपंच अशोक येलमुले राकेश सडमेकसह आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close