पुतन्याचा कार्यकाळात अर्धवट असलेली बसस्थानकाची बांधकाम काकांच्या कार्यकाळात तरी पूर्ण होईल काय ?
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …रवी सल्लम सिरोंचा…
सिरोंचा….मागील दोनवर्षांपासून येथील नवीन बसस्थानकाची बांधकाम अर्धवट असल्याने प्रवाश्यांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे.सरकार व परिवहन महामंडळ या बांधकामाकडे दिवसेंदिवस दुर्लक्ष करीत असल्याने आंतरराज्य प्रवाश्यांना नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागील भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात येथील प्रवाश्यांना सोयीचे व्हावे म्हणून अंदाजे 2कोटी 27 लक्ष रु.निधी उपलब्ध करीत सिरोंचासाठी आंतरराज्य बसस्थानक मंजूर केले होते. या नवीन बसस्थानक बांधकामाची भूमिपूजन माजी राज्यमंत्री अंबरीशराव आत्राम यांच्या हस्ते पार पडला होता.भूमीपुजना नंतर बांधकामालाही मोठ्या जोमाने सुरू झाली होती. परंतु कोविड -19 मुळे काम बंद पडला होता. कोविड -19 ची प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर सगळीकडे विकास कामांची परत श्रीगणेशा झाली मात्र येथील अर्धवट असलेल्या बसस्थानाकाचे बांधकामाला अद्याप सुरुवात न झाल्याने येथील नागरिकांमध्ये “पुतन्यांचा कार्यकाळात अर्धवट असलेली बसस्थानाकाची बांधकाम काकांच्या कार्यकाळात तरी पूर्ण होतील का ? अशी सर्वत्र चर्चा होतांना दिसून येत आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या त्रिशंकू लढतीत काकाने पुतण्याला हरवून धर्मराव बाबा आत्राम हे आमदार म्हणून निवडून आले होते.या निवडणुकीत येथील बसस्थानकाचे मुहूर्तमेढ रोवणारे भाजपचे उमेदवार अंबरीशराव आत्राम यांचे निसटटा पराभव झाले. अहेरीचे आमदार व राज्यमंत्री म्हणून असतांना अंबरीशराव आत्राम यांनी येथील नवीन बसस्थानकाला मंजुरी मिळवून दिली होती.त्यांचा पराभवानंतर राज्यात सत्तांतर होऊन मविआ ची सरकार बनली.राज्यातल्या मविआ सरकारमध्ये आमदार धर्मराव बाबा आत्राम हे ज्येष्ठ सदस्य होते.हे इथे उल्लेखनीय आहे .अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी निवडून आल्यानंतर प्रामाणिकपणे समस्या सुटावे म्हणून येथील बसस्थानकाच्या बांधकांमाविषयी अधिवेशन काळात सभागृहात आवश्यक निधी बाबत प्रश्न उपस्तीत केले होते.मात्र माविआ सत्तेत असतांना येथील बसस्थानक विषयी कोणत्याही प्रकारची सकारात्मक पाऊल उचलले नव्हते.हे विशेष …म्हणून आज ही येथील बसस्थानकाची बांधकाम ठप्प आहे. विशेष म्हणजे माजी राज्यमंत्री व आमदार धर्मराव बाबा आत्राम व माजी राज्यमंत्री अंबरीशराव आत्राम यादोघांची काका,पुतन्यांची नातं होय.