अहेरी तालुका
अहेरीचे वाहतूक निरीक्षक राजवैद्य यांची बदली तात्काळ रद्द करण्याची मागणी !
![](https://vidarbhakranti.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230120-WA0351_copy_640x288.jpg)
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरीचे वाहतूक निरीक्षक राजेंद्र वैद्य यांची बदली अचानक पणें करण्यात आले.कामगारांकडून कोणतेही तक्रार नसताना सुद्धा त्यांची बद्दली कशी काय केले?असा सवाल एस टी चे चालक व वाहकाकडून उपस्थित होत आहे.करिता जितेंद्र राजवैद्य यांची बदली तत्काळ रद्द करून त्यांना अहेरी आगारातच पुनः नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी एसटी कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी एसटी कष्टकरी कामगार संघटनचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात हेमंत पुल्लीवर उपाध्यक्ष,एस व्हीं कुमरे अगार सचिव,आसिफ कुरेशी कोषाध्यक्ष, सत्यनारायण कुमरे, प्रदीप मेश्राम, महादेव कोडापे, अंकुश येरकड, नवनाथ घायाळ, गणेश मोहूर्ले, राजु श्रीरामवार, व समस्त एसटी कर्मचारी कामगार उपस्थित होते.