गडचिरोली जिल्हासामाजिक

मलमपडी येथील आत्महत्या ग्रस्त युवा शेतकऱ्याची शेतीची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून पाहणी

*विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …एटापल्ली

मृतकाचे शेतामध्ये साचले सुरजागड लोहप्रकल्पाचे गाळ

*एटापल्ली* तालुक्यातील मलमपडी येथील युवा शेतकरी अजय दिलराम टोप्पो यांनी आपल्या शेतामध्ये सुरजागड प्रकल्पातील गाळ साचल्याने संपूर्ण शेतातील पीके नष्ट झाल्यामुळे कर्जबाजारी होऊन गळफास लावून आत्महत्या केली होती. या युवा शेतकऱ्याची आत्महत्या जिल्ह्यात गाजत असतांनाच काल आविस नेते व माजी आमदार आत्राम यांनी मृतक शेतकऱ्याची कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले व त्या कुटुंबाला आर्थिक मदत ही केली. सांत्वन प्रसंगी मृतकाचे कुटुंबांनी अजय टोप्पो यांचा आत्महत्या मागील कारणे माजी आमदार आत्राम यांच्यासमोर मांडले.यात प्रामुख्याने संपूर्ण शेतामध्ये सुरजागड प्रकल्पाचे पावसाच्या पाण्यामुळे गाळ साचल्याने शेतीमधील उभी पिके नष्ट झाल्याने या नैराश्येपोठीच आत्महत्या केल्याची सांगितले.

मृतक कुटूंबाची सांत्वनानंतर माजी आमदार आत्राम यांनीआपल्या कार्यकर्त्या समवेत मृतकाचे शेतापर्यंत प्रत्यक्ष जाऊन शेतामध्ये साचलेल्या गाळात स्वतः उतरून मृतकाची शेतीची खरी परिस्थितीची पाहणी केली.पाहणीदरम्यान त्यांना संपूर्ण शेतामध्ये सुरजागड प्रकल्पाचे गाळ साचल्याने दिसून आले.शेतात पेरणी केलेले उभी पिके नष्ट झाल्याचे ही पाहणीत दिसून आले. मृतक शेतकऱ्याचा शेतीची पाहणी दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य व आविसचे युवा नेते संजुभाऊ चरडुके,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, माजी पंचायत समिती सदस्य रमेश तोरे, माजी सरपंच विजय कुसनाके,ग्रा.प.सदस्य अजय मडावी,दिलीप आलाम,संदीप बडगे,अशोक बडा,अजित बखळा, श्यामराव कुमरे,आनंद बखळा, अजित बखळा सह कुटुंबातील सदस्य व गावकरी उपस्तीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close