प्रत्येक खेळाडूंनी खिलाडीवृत्ती अंगीकारून क्रिडा स्पर्धेत भाग घ्यावे…माजी आमदार दिपक दादा आत्राम
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …मूलचेरा …
*लगाम*...आजचे क्रिडा क्षेत्र हे स्पर्धात्मक असून क्रिडा स्पर्धांमंध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूनी सामना जिंकण्यासाठी जिद्द, चिकाटीसह खिलाडीवृत्ती अंगीकारून जर खेळल्यास स्वतःच्या संघाला नक्कीच विजय संपादन करून देईल,असे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व अहेरीचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी केले. ते आदिवासी विद्यार्थी संघ उपशाखा नागुलवाही कडून आयोजित राष्ट्रीय शहीद भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती कार्यक्रम व रबरी बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन सोहळ्याप्रसंगी उदघाटक म्हणून बोलतांना केले.
नागुलवाही येथे आयोजित राष्ट्रीय शहीद भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम व रबरी बाल क्रिकेट सामन्याचे उदघाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच मनीष माराटकर,ग्रा.पं. सदस्य दिवाकर सिडाम, आविस सल्लागार किर्तीमंतराव शिडाम, साईनाथ पानेमवार, लिंगाजी टेकुलवार, शंकर पानेमवार, कमल बाला, विशाल रापेल्लीवार,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख, मोहनदास मडावी, सत्यवान रामटेके,काशिनाथ मडावी, रामदास सिडाम,सुरेश रामटेके, संजय भीटपल्लीवार, नामदेव आत्राम,संजय आत्राम,राकेश आत्राम,नरेश राऊत, हरेंद्र मडावी,वसंत आत्राम,सुधाकर टेकाम, मारोती राऊत,प्रकाश आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी क्रिडा विषयी बहुमूल्य मार्गदर्शन करित राष्ट्रीय शहीद भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या संघर्षमय जीवांपटलावर प्रकाश टाकले. यावेळी कार्यक्रमाची उदघाटन माजी आमदार आत्राम यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला विधिवत पूजा अर्चना करून आदरांजलीसह अभिवादन करून करण्यात आली. या रबरी बाल क्रिकेट सामन्यासाठी पहिला पारितोषिक माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून 20 हजार रु रोख तर द्वितीय पुरस्कार माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून 15 हजार रु.रोख तर तृतीय पुरस्कार जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा नागुलवाही कडून 7 हजार रु रोख असे बक्षीस ठेवण्यात आले. या सामन्यासाठी मान्यवरांकडून अनेक आकर्षक वयक्तिक पुरस्कार ही ठेवण्यात आले. या क्रिकेट सामन्याचे उदघाटन सोहळा व राष्ट्रीय शहीद भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमाला खेळाडू,क्रीडाप्रेमी सह नागरिकांची अलोट गर्दी होती.