अहेरी तालुका

पूरबाधित व अतिवृष्टीग्रस्त नागरिकांची नुकसानीची तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….प्रतिनिधी…

अहेरी : मागील चार – पाच दिवसांपासून सगळीकडे संततधार पाऊस सुरू असून त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने याची फटका सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना सुध्दा खूप मोठ्या प्रमाणात बसले असून संततधार पाऊस व पूरजन्य परिसथितीमुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील अनेक नागरिकांचे घरांचे पडझड झाली असून तसेच शेतकऱ्यांचे सुध्दा अतोनात नुकसान झाली असून सरकार व संबंधित विभागाने नुकसानीची पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी काँगेस नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आह.

संततधार पावसामुळे नुकसान झालेल्यांची आणि पूरजन्य परिस्थितीत अडकलेल्यांची अजयभाऊ कांकडलवार यांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भेटी देत आपल्यापरीने मदत कार्याला सुरुवात केली आहे.तसेच त्यांनी नागरिकांसाठी आपल्या स्वतःची चोवीस तास हेल्पलाईन सेवा सुध्दा सुरू केली आहे.

अजयभाऊ कंकडालवार यांनी आज पूरग्रस्त गावांना भेट देऊन तेथील नागरिकांची अडीअडचणी जाणून घेतले.तसेच अनेक नुकसान ग्रस्तांना आपल्यापरीने आर्थिक मदतीचे हात दिले.

पूरग्रस्त गावांची पाहणी दरम्यान कंकडालवार यांचे समवेत माजी जि.प.सदस्य अजय नैताम,इंदारमचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य गुलाबराव सोयाम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवार,नरेश गर्गमसह काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close