अहेरी तालुका

मरपल्ली येथील नागरिकांसोबत माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी साधला संवाद

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

📝अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत मरपली अंतर्गत येत असलेल्या मरपली,भास्वापूर,करंचा या गावात विविध समस्या निर्माण झाले आहेत.पाण्याची,गली रस्ते,नाली व विद्युत खांब तसेच तलाव आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी संवाद सभेत माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांना सांगितले.यावेळी जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांनी आपण या क्षेत्रातून पहिल्यादा निवडुन दिले त्यानंतर आदिवासी विध्यार्थी संघाकडून माझे सहकारी बंधु माजी जि.प.सदस्य अजय नैताम यांना निवडुन दिले असल्याने मी जि.प.अध्यक्ष या नात्याने रेपनपली-उमानूर क्षेत्रात जास्तीतजास्त निधी देवून या परिसराच्या विकास करण्यासाठी प्रयत्न केले असून भरपूर विकास कामे आजही सुरू आहेत, मात्र उर्वरित समस्याच्या निराकरण करण्यासाठी आपण नेहमी तत्पर आहो असे नागरिकांना आश्वासन दिले. या संवाद सभेला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी सभापती सुरेखा आलाम,माजी पंचायत समिती सदस्या शारदा कोरेत,ग्राम पंचायत सदस्या सुनंदा आत्राम,माजी सरपंच हनमंतू कोरेत,माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रतिष्ठित नागरिक निलेश कूड़मेथे,बापू बेडकी,व्येंकटी कोंडागूर्ले,लचया सिडाम,शंकर कोंडागूर्ले,दिकोंडा,व गावातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close