युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासावी …माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
📝युवक या देशाचा आधारस्तंभ असुन युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासात व्यक्तीमत्व विकासाला चालना देत खेळखेळत राहावे जय पराजय होत असतो मात्र खचून ना जाता आत्मविश्वासानी प्रयत्न केल्यास खूप उंचीवार जाऊ शकतो असे प्रतिपादन अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम यांनी केली.
ते मूलचेरा तालुक्यातील बंदूकपल्ली येथे आयोजित व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन प्रसंगी केले .
यावेळी खेळाडूना मार्गदर्शनात करतांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार
म्हणाले युवकांमध्ये सुप्त गुण दडलेले आहेत ते सुप्त गुण प्रदर्शित करण्यासाठी असे क्रिडा सम्मेलन घेणे गरजेचे आहे,मात्र या साठी शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही पण युवकांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघाकडून प्रत्येक गांवात पुरस्कार देत असतो,खेळ खेळत असताना हार-जीत होत असते मात्र आपण हरलो म्हणून खचून जाऊ नये विजय एक दिवस आपली पण होऊ शकतो तसेच पुढे बोलताना म्हणाले ग्रामीण असो किंवा शहरी असो प्रत्येक ठिकाणी व्हलिबाल, क्रिकेट,कबड्डी स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहेत प्रत्येक ठिकाणी आदिवासी विद्यार्थी संघाकडून पारितोषिक देत असताना आम्हचा एकच उद्देश्य आहे.युवकांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ तयार झाले पाहिजे व एक चांगल खेळाडू तयार झाले पाहिजे तेव्हाच तर आपल्या गावाच्या व तालुक्याच्या नावलौकीक होत असतो.हे होत असताना गावातीला सामाजिक,शैक्षणिक,व विकासाबाबतीत चर्चा घडून येत असते व समस्याच्या निराकरण होत असते असे मत व्यक्त केले. यावेळी मंचावर मा.रोशनीताई कुसनाके सरपंच कोठारी,सुनीता कुसनाके नगरसेविका मुलचेरा,प्रशांत गोडसेलवार,कालिदास कुसनाके सदस्य ग्रा.प.स्वप्नील कोकिरवार सदस्य,टिल्लू मुखर्जी सामाजीक कार्यकर्ते, चलावार काका,मधुकर कुळमेते,जयराम तोर्रेम, राटोड म्याडम,हिरामण तोर्रे,नैताम म्याडम,शंकर आत्राम,बाबूल काका, करमकार होते.
यस्ववीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष:-राजेश्वर आलाम,उपाध्यक्ष:- किशोर करपेत,सचिव:-महेश तोरे, कोषाध्यक्ष:-सुनील आत्राम,उपकोषाध्यक्ष:-रोहन मडावी,क्रीडा प्रमुख:-हरीश कन्नाके व मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य गण अभिषेक आलाम,साईनेश्वर मडावी,रोशन तलांडे,अविनाश पेंदाम,संमी मडावी,दीपक मडावी,विलास साडमेक,दीपक पेंदाम,अजय सिडाम,विक्की तोरे,चंद्रकांत मडावी,अप्रोज तोरे,खुशाल आत्राम,आकाश आत्राम तसेच गावकरी व महिला वर्ग उपस्थित होते.