एटापल्ली तालुका

बारसेवाडा येथील ग्रामस्थांसोबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी साधला संवाद !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…एटापल्ली

एटापल्ली…तालुक्यातील अतिदुर्गम ,नक्षलग्रस्त व मागासलेल्या गाव म्हणून ओळख असलेल्या बारसेवाडा येथील ग्रामस्थांसोबत आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी ग्रामस्थांसोबत जनसंवाद साधत त्यांच्या गावातील प्रमुख समस्या जाणून घेतल्या.यावेळी बारसेवाडा सह परिसरातील असंख्य ग्रामस्थांनी जनसंवादाला उपस्थित राहून माजी आमदार दिपक आत्राम यांच्यापुढे प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य,सिंचन,रस्ते,वनहक्के दावे,शिक्षण,रोजगार असे महत्वपूर्ण समस्या मांडल्या असता माजी आमदार आत्राम यांनी बारसेवाडा व परिसरातील गावांमधील समस्या टप्प्याटप्प्याने का होईना पण आपण प्रामाणिकपणे सोडविण्याचे प्रयत्न करू व समस्यांची सोडवणूकिसाठी सरकारकडेही पाठपुरावा करू,असे आश्वासन दिले.

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या जनसंवादाला बारसेवाडा येथील ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार आत्राम यांचेसोबत माजी जि.प.सदस्य संजुभाऊ चरडुके,पोलीस पाटील लालूजी मडावी, गाव भूमिया सम्माजी मडावी, डॉ.ब्रह्मनंद पुंगाटी, मधुकर मडावी, तुळशीराम हलामी, श्यामराव मडावी,विलास तिम्मा, देवानंद पुंगाटी, सावित्री आतलामी,ताराबाई तिम्मा, सरिता वाचामी, वैशाली पुंगाटी, तेजराव पोई,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,माजी पंचायत समिती सदस्य रमेश तोरे,माजी सरपंच विजय कुसनाके,संदीप बडगे,सुरेंद्र वैरागडे,तुषार वैरागडे, अजित कुलयेटी, किरण भांडेकर, गणेश मडावी आदि मान्यवरांसह जनसंवादाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close