भामरागड तालुका

शेवटचं घटकांना कल्याणकारी योजनांच्या लाभ मिळवून देऊ….माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

भामरागड : तालुक्यातील ताडगाव येते आदिवासी विद्यार्थी संघ व ग्रामसभा च्या वतीने भव्य चर्चा सत्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आली होती.परिसरातील कानाकोपऱ्यातून आदिवासी विध्यार्थी संघाचे कार्यकर्ते व नागरिक एकत्र आले होते,यावेळी उदघाटन स्थानावरून मार्गदर्शन करतांना म्हणाले आदिवासी विध्यार्थी संघाचे काम हाताळण्यात व शासनाची विविध विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या तालुक्यातील दुर्गम भागातील कार्यकर्त्याच्या मोलाचा वाटा असून याच आम्हाला अभिमान असून जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेवटच्या नागरिकांना मिळतो की नाही याची माहिती पोहोचवून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तत्पर आहेत,वेळ देऊन संघटनेच्या काम समोर वाढवित आहेत हे त्यांचे काम कौतुकास्पद आहे.शासनाच्या योजनांचा लाभ मिळाले की नाही,त्यांना योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावे व स्वतःपुढाकार घ्यावा व संघटन तालुक्यातील ग्रामीण परिसरात वाढविण्यासाठी परिश्रम घ्यावा.असे सांगतांना गेल्या अनेक वर्षांपासून मी गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अविस संघटनेचा काम करीत आहे सर्वांना काम करतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असतो परंतु संघटने सोबत नागरिकांना सुद्धा वेळ देणे गरजेचे आहे व जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मार्गदर्शन करत असताना जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी म्हणाले कि,आज अनेक गावात सुंदर रस्ते झाले आहेत,मी या क्षेत्रांतून निवडून आलो नव्हतो मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पद माझ्याकडे होता त्यामुळे आज हक्कानी सांगतो कि,या जिल्हात व तालुक्यात सर्वाधिक निधी आणून विकासाचे कामे करता आले,त्यात आरोग्य,शिक्षण,पाण्याच्या समस्या असेल व वैयक्तिक अडीअडचण असेल आपण नेहमी मदत केली असून येणाऱ्या काळात आपण नेहमी तुम्हाच्या सोबत उभी राहण्यासाठी तत्पर आहो.अशी ग्वाही यावेळी दिली.यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सरसेनापती नंदूभाऊ नरोटे यांनी म्हणाले आविस हे संघटना लहान लहान कार्यकर्ता सोबत घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांनावर होणारे अत्याचार अन्याय विरोधात अनेक आंदोलन,मोर्चे,उपोषण करत अनेक कार्यकर्तेवर गुन्हे नोंद होतांना जिवाच्या पर्वा ना करता अनेकांना राजकीय क्षेत्रात मोठ्यामोठ्या पदांवर पोचवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करून आज जिल्हात एक वेगळीच ओडख निर्माण केली आहे असून आदिवासी विद्यार्थी संघटना हि आजही अन्याय अत्याचार विरोधात सर्व घटकांसोबत उभे राहून आपल्या हक्क मिळवून देण्यासाठी तत्पर असून तडगळतील कार्यकर्ता हा संघटनेच्या आत्मा असल्याचं सांगत येणाऱ्या काळात पुन्हा एकदा जोमाने कार्य करत संघटनेसाठी वेळ द्यावी अशी विनंती केली.

यावेळी मंचावर विष्णुजी मडावी उपाध्यक्ष नगरपंचायत भामरागड,लालसू आत्राम माजी सभापती,सर्जु सडमेक नगरसेवक भामरागड,राकेश महाका नगरसेवक भामरागड,तपेश हलदर प्रतिष्ठीत नागरिक भामरागड,दिलीप उईके नगरसेवक भामरागड,नंदुभाऊ मट्टामी आविस अध्यक्ष एटापल्ली,श्रीरामजी हेडो,प्रज्वल नागुलवार आविसं सचिव एटापल्ली,आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे भामरागड तालुका अध्यक्ष सुधाकर तिम्मा,रोजा करपेत नगराध्यक्ष न.प.अहेरी,शैलेश पटवर्धन नगर उपाधक्ष्य अहेरी,अजय नैताम माजी जिल्हा परिषद सदस्य,सुनिता कुसनाके माजी जिल्हा परिषद सदस्य, भास्कर तलांडे माजी सभापती अहेरी,सुरेखा आलाम माजी सभापती अहेरी,नौरास शेख नगरसेविका अहेरी,प्रशांत गोडशेलवार न.सेवक अहेरी,दिलीप मडावी सरपंच वांगेपल्ली,अशोक येलमुले माजी सरपंच किस्टापुर,महेश लेकुर ग्राप सदस्य,प्रमोद आत्राम माजी सरपंच पेरमेली,नरेंद्र गर्गम ग्रामीण अध्यक्ष आविसं व अजयभाऊ मित्र परिवार अहेरी,कमला कुरसाम सरपंच येचली,नीलेश वेलादी सरपंच मेडपल्ली,सिताराम मडावी सामजिक कार्यकर्ता जिंजगाव,किरण कोरेत सरपंच पेरमिली,डॉ.सत्तमवार सा.आरोग्य वर्धनी ताडगाव,संजय येजुलवार उपसरपंच येचलि,अनिल करमरकर कृषि बाजार संचालक,नामदेव हीचामी न. सेवक एटापल्ली,बालु बोगामी,उपसरपंच लाहेरी,अजय गावडे पो.पाटिल उडेरा,मट्टामी पो.पा.अलेंगा,कोकण सरकार,सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत बोगामी,महेश बिरामवार,अजय कोरेत,रेणू कुळ्येटी,प्रकाश मडावी,संतोष उसेंडी,सुनील मडावी,नरेंद्र मदावी,दल्लू उसेंडी,दानु आत्राम,संतोष कोर्सा,प्रवीण सेगाम,राकेश संगमवर,देवू तलंडी,आकाश धूर्वे,ललित बंडावार,चीनु सडमेक,प्रभाकर मडावी,दिनेश जुमडे,पंकज पुजलवार,गणेश नागपूरवार,भास्कर सडमेक,काशिनाथ मडावी,संदिप गावडे, रावजी मडावी,श्रीनिवास दुर्गे,नारायण तानसेन,श्रीनिवास कुंदाराम व समस्त भामरागड तालुक्यातील आविसं व ग्रामसभा तथा अजयभाऊ मिञपरिवार चे कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर चर्चासत्र मेळाव्याच्या यशस्वीसाठी आयोजक : माजी उपसभापती भामरागड लालसू आत्राम – जगदीश कोंकमुट्टीवार सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close